बड़े दौर गुजरे हैं जिंदगी के,यह दौर भी गुजर जायेगा..
थाम लो अपने पांव को घरों में.. ये मंज़र भी थम जाएगा...बहुतांशी लोकांना देशावर आलेल्या संकटाचं गांभीर्य कळू लागलंय.. तुलनेमधे वाढत्या प्रमाणावर आपण शहाण्यासारखे वागतोय.. अनेक विदेशांतील हृदयद्रावक कहाण्या ऐकून कदाचित त्यातून काही बोधही घेतोय... त्यामुळं काही कालावधीनं का होईना संकटावर परतून वार करण्याची शक्यता निर्माण होऊ पाहातेय.. आणि आपण असेच संवेदनशीलतेनं वागत राहिलो तर त्यानंतरच्या सुखसमृद्धीच्या आगमनाचा संकेत तर ह्या काऊंच्या गलक्याने दिला नसेल! असेल.. कदाचित तसंच असेल! आता ते सत्यात उतरवण्यासाठी आपण परिस्थितीचं गांभीर्य आणखी आणखी समजून घेऊया, नियमबद्ध राहाण्याचं महत्व ओळखूया, आपल्या पिलांना घरट्यात एकाकी सोडून आपल्या रक्षणासाठी झटणाऱ्या आपल्या बांधवांची कदर करूया आणि लवकरात लवकर जिंकूया...
आपल्या रक्षणासाठी झटणाऱ्या आपल्या बांधवांची कदर करूया थोडा विचार 'करो ना'...
अनामिका (PMJ)
No comments:
Post a Comment