हम युवा है हम करे मुश्किलों से सामना मातृभूमी हित जगे है हमारी कामना .....
नेताजी सुभाषचंद्र बोस हे जन्मजात हुशार होते. त्यांच्या वडील वकिलांची इच्छा होती की त्यांनी आयसीएस अधिकारी बनावे. वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी सुभाषबाबू इंग्लंडला गेले आणि आयसीएसची परीक्षा उत्तीर्ण केली. परंतु त्यांचा इंग्रजांच्या गुलामीला विरोध होता. त्यांच्यात राष्ट्रसेवेची प्रबळ इच्छा होती. एकीकडे आयसीएसचे उच्च पद होते तर दुसरीकडे सेवेचा कठीण त्यागमय मार्ग होता. याचे त्यांच्या मनात अंतर्द्वंद्व चालू होते. शेवटी सेवेचा भाव जिंकला आणि नोकरी करायची नाही असा निर्णय त्यांनी घेतला. त्यांनी आपला राजीनामा मंत्री मॉंटेग्यू यांच्याकडे सोपविला. भारतीय कार्यालयात त्यांच्या वडिलांचे मित्र विल्यम ड्युक यांनी त्यांचा राजीनामा आपल्याजवळ ठेवून त्यांच्या वडिलांना सूचना पाठविली. वडिलांनी उत्तर पाठविले,’’ मी माझ्या मुलाच्या या कार्याकडे गौरव म्हणून पाहतोय. मी त्याची ही अट मान्य करण्यासाठी त्याला विलायतेला पाठविले होते.’’ विल्यम ड्युक या उत्तराने हैराण झाला. त्यांनी सुभाषचंद्र यांना विचारले,’’ तरूणा, तुझ्या उदरनिर्वाहाची तू काय सोय करणार आहेस ?’’ सुभाषबाबू पटकन उत्तरले,’’ मला लहानपणापासून दोन आण्यात भागवायची सवय आहे आणि दोन आणे मी कसेही मिळवीन.’’ विल्यम ड्युक अवाक् होऊन त्यांच्याकडे पाहू लागले. सुभाषचंद्रांना त्यांच्या वडिलांनी पत्र लिहीले, त्यात ते म्हणाले,’’ तू देशसेवेचे व्रत घेतले आहेस याचा मला अभिमान आहे. तुला या राष्ट्रकार्यात यश मिळो.’’ यावर सुभाषचंद्रांनी वडिलांना लिहीले,’’ बाबा, मला आज स्वत:वर गर्व होत आहे. याआधी इतका कधीच झाला नव्हता. "
कथासार- राष्ट्रसेवेची आवड असणारे प्रत्येकजण अनुकूल प्रतिकुल परिस्थितीतही ते कार्य करतात. याला कुटुंबाचे सहकार्य व समर्थन ही राष्ट्रसेवा करण्यास उद्युक्त करते.
मला माहीत आहे ,सुरक्षित छप्पराखाली, भरल्यापोटी हे लिहिणं खूप सोपं आहे. पण आपण प्रत्येकानं एक पाऊल पुढं टाकलं तर खरंच शक्य नाहीये हे? आणि मुळात हे पाऊल उचलणं जड जात असेल तर आपल्या दृष्टीवरची स्वार्थी झापडं काढून जरा आजूबाजूला पाहुया.... ह्या राष्ट्राला वाचविण्यासाठी खऱ्या अर्थानं मैदानात उतरलेले असंख्य जीव दिसतील, प्रत्येक जीव स्वत:चा जीव तळहातावर झेलत आपल्या जिवाला तळहातावरच्या फोडासारखं जपतोय, त्यांच्या काळजाच्या तुकड्यांना डोळे भरून पाहाणं, चिमुकल्या हातांची लाघवी गळाभेट अनुभवणं, जोडीदाराच्या हातात हात देऊन दोन क्षणांचा संवाद साधणं ह्या साध्यासाध्या गोष्टींनाही पारखे झालेत ते... त्यांच्या प्राणांतली संजीवनी हरपतेय तरीही त्यांनी पाऊल माघारी वळवलेलं नाही आणि आपण बेदरकारपणे सुखांच्या राशींत लोळत असताना त्या राशींतला एक घास काढून एका पीडिताच्या मुखी नाही भरवू शकत? लोंढेच्या लोंढे पोटाच्या खळगीसाठी वाट चालताहेत... त्यांना समजवायला आपल्याकडे शब्दही नाहीत आणि आपली तेवढी कुवतही नाही, त्यांची विचारधारा त्यांच्या परिस्थितीतून, त्यांच्या जगण्यातून आलेली आहे. तिला निष्ठूरपणे दोषी ठरवणं हेही योग्य ठरणार नाही. मात्र त्यांना मदत करणारे अनेक थांबे सरकार, सेवाभावी संस्था, पोलिसांनी उभे केले आहेत. तिथं दोन घासाची व्यवस्था व्हावी हे नाही जमू शकणार आपल्याला? नक्कीच जमेल करूया आपण चला तर मग लागा कामाला...
हम युवा है हम करे मुश्किलों से सामना
मातृभूमी हित जगे है हमारी कामना ॥धृ॥
संस्कृती पली यहाँ पुण्य भू जो प्यारी है
जननी वीरों की अनेकों की भरत भू हमारी है
ऐसा अब युवक कहाँ दिल मे ज़िसके राम ना ॥१॥
ये कदम हजारों अब रुक ना पायेंगे कभी
मंझीलों पे पहुंचकर ही विराम ले सभी
ध्येय पूर्ती पुर्व अब रुक ना पाये साधना ॥२॥
ज्ञान के प्रकाश की ले मशाल हाथ में
शील की पवित्रता है हमारे साथ में
एकता के स्वर उठे छुनेको ये आसमाँ ॥३॥
आँधीयों में स्वार्थ की त्याग दीप ना बुझे
मातृभू को प्राण दूँ याद है शपथ मुझे
मै कहाँ अकेला हूँ साथ है ये कारवा ॥४॥
हम युवा है हम करे मुश्किलों से सामना
मातृभूमी हित जगे है हमारी कामना
आपल्याच सुरक्षेसाठी दिवस रात्र उभे असलेले आपले पोलीस बांधव, तसेच काही पीडित जन त्याच्या मुखी दोन घास भरवुया? थोडा विचार 'करो ना'..
अनामिका (PMJ)
No comments:
Post a Comment