Tuesday 14 April 2020

थोडा विचार 'करो ना' लॉकडाउन दिवस एकविस..13/4/2020

भारत हमारी माँ है माता का रूप प्यारा
करना इसी की रक्षा कर्तव्य है हमारा ||


कर्म म्हणजे कर्तव्य करणे हाच अधिकार आहे. कर्तव्याचा अधिकार ही घराने व्यक्तीला दिलेली व मिळालेली देणगीच आहे. एक अंधळा व एक लंगडा – दोघांनाही एकाच गावी जायचे आहे. ते दोघे जर परस्पर सहकार्याने काम करतील – म्हणजे अंधळा लंगड्याला उचलून घेईल व लंगडा अंधळ्याला वाट दाखवील, तर काम सुलभ होईल. घराच्या भल्याकरिताही कर्तव्याची जाण व अधिकाराचे भान दोन्ही आवश्यक आहेत. स्वतःचे कर्तव्य बजावत असता तसाच व्यवहार इतरांकडून अपेक्षिण्याचा अधिकार त्या व्यक्तीला असतीच. तसे होत नसेल तर तशी जाणीव येणे हेही एक कर्तव्यच बनते. घरातील मोठी माणसे या सर्व गोष्टी कुशलतेने करवून घेऊन शकतात.

व्यक्तीला हा कर्तव्याचा अधिकार प्राप्त झाला की, जणू काही तो अखिल विश्वाचा सम्राटच बनतो, असे म्हणायला हरकत नाही. केवळ नवीन खेळणे हातांत आले की, व्यक्ती त्याचा उपयोग आधी स्वतासाठी, स्वतावर प्रयोग करते. माझे स्वसंबंधी कर्तव्य-उत्तम, देहसंपदा,सद्गुणांचा विकास अन या सगळ्या गोष्टींचा सत्कार्यासाठी उपयोग करण्याची बुद्धी- या सर्व गोष्टी प्राप्त करणे हे झाले स्वसंबधी कर्तव्य. यातूनच निर्माण होतो कुटुंबासंबंधी कर्तव्यभाव. कुटुंबीयांचा विकास व्हावा, त्यांची सुरक्षीतता, शिक्षण, स्वास्थ, मानसिक स्थैर्य व आवश्यक गोष्टींची पूर्तता यासाठी हा ‘ स्व‘ प्रयत्नशील राहतो. पण तेवढ्यापुरतीच त्याच्या कर्तव्याची मर्यादा असत नाही. शेजारीपाजारी- गाव- तालुका- म्हणजे समाज- राष्ट्र- पक्षी, प्राणी, कीटक, वनस्पती आदी सजीव स्रुष्टी- परमेष्टी असे हे वर्तुळ वुस्तारत जाते.

कर्तव्यविचार अधिकाधिक विकसित अगदी सहजपणे होत जातो. माझ्या कुटुंबीयांबद्दलची भावना हळूहळू विस्र्तुत होत जाते व शेजारीपजारीसुध्दा सुखी व्हावेत, असे वाटू लागते. शेजारच्या काका-काकुबद्दल आपुलकी वाटायला लागते. त्यांव्या आनंदात सहभागी होणे त्यांच्या अड्चणीच्या वेळी मदत करणे हा स्वभाव बनतो. शेजारची मुलगी माझी ताई,मावशी आत्या बनते. मग तिची कुचेष्टा करायला मन धजत नाही. कोणी कुचेष्टा करु लागले तरी राग येतो. आपल्या लक्षात येइल की, हा भाव कमी झाल्यामुळे आजकाल ‘स्त्री‘ वर वासनेला बळी पड्ण्याचे प्रसंग उदभवतात. साधारणपणे ज्या घरात ओळखीच्या मुला-मुलीना दादा, ताई, ती मुली- मुले अशा अनैतिक गोष्टीना बळी पडत नाहीत. हाच ममत्वाचा भाव पशुपक्षी, कीटक, वनस्पती यांबाबतही उत्पन्न होतो. त्यांचे रक्षण, त्यांच्याबद्दल ममत्वभाव या गोष्टी सहजरीत्या घडत राहतात. पूर्वी घराच्या उंच भिंतींना पक्षांच्या निवासासाठी विटांमद्ये पोकळ जागा आवर्जून ठेवली जायची. आजही मोठमोठ्या शहरांतून कबुतरे व पक्षी यांना धान्य घालण्यासाठी ठेवली जायची.

वरील सर्व कर्तव्य भाव आपण आपसुक शिकत
असतो नव्हे व्यवहारात वापरतो. तो वारसा आपल्याला आपल्या संस्कृतीने दिला आहेच पण आज हे सांगण्याचा उद्देश असा की हाच कर्तव्यभाव आपल्याला आता तन-मन-धन वापरून आपल्या भारत मातेकरीता दाखवायचा आहे आपल्यावर आलेल्या संकटाची तिव्रता आजुन कमी झालेली नाही उलट दुर्रदैवाने वाढत जात आहे त्यासाठी लाॅकडाउन हा शब्दही न ऐकलेले आपण 21 दिवस अगदी अतिमहत्वाच्या कामाखेरीच बाहेर गेलेलो नाही. घरातच बसून आहोत .देशाच्या उंबरठ्यावरून वेगानं आत घुसू पाहाणाऱ्या संकटानं आज अनपेक्षितपणे असा विसावा आपल्या सर्वांच्याच वाट्याला आणला आहे. कधी नव्हे ते आपण पाहातोय कि काही अपवाद वगळता सगळी नेतेमंडळी अद्वैत होऊन उभी ठाकलीहेत ह्या संकटाशी दोन हात करायला! दुजाभाव न करता एकीनं उभं ठाकलेलं आपलं राष्ट्र आपला येणारा भविष्यकाळ सुंदर करेलच आणि प्रकाशाची पाऊलवाट होत अवघ्या विश्वालाही सोनेरी पहाटेकडे घेऊन गेल्याशिवाय राहाणार नाही. तेव्हां आपलाच आतला आवाज ऐकूया, आपल्याच आंतरवृत्ती जागृत करूया, दूत होऊन आलेल्या वेदनेला समजून घेऊया आणि स्वत:शी-प्रत्येकाशी-विश्वाशी जोडले जात तेजस्वितेशी एकरूप होवू या ....या प्रसंगी फक्त एकच पद्य रचना आठवते

भारत हमारी माँ है माता का रूप प्यारा
करना इसी की रक्षा कर्तव्य है हमारा ॥धृ॥
जननी समान धरती जिस पे जनम लिया है
निज अन्न वायु जल से जिसने बडा किया है
जीवन वो कैसा जीवन इसपे अगर न वारा ...

आपले स्वसंबधी कर्तव्य बाजुला ठेवून सामाजीक कर्तव्य करूया का? थोडा विचार 'करो ना'
अनामिका (PMJ)

1 comment: