Monday 17 October 2016

आम्ही प्रोग्रामर्स
हुशार आम्ही प्रोग्रामर्स आम्हाला काय कुणाची भीती
चाट, मैल अन सर्फिंग मुळे बिघडत चालली आहे नाती ...
हुशार आम्ही प्रोग्रामर्स आम्हाला काय कुणाची भीती
सकाळी उशिरा उठणारे आम्ही, देवाआधी मोबाईल कडे पाहतो.
आमच्या सुंदर डोळ्यांनी, संगणकावरील निर्जीव चित्रे पाहतो.
निसर्ग पाहायला जायला, आम्हाला वेळ कधी का मिळतो ?
कारण हुशार आम्ही प्रोग्रामर्स आम्हाला काय कुणाची भीती
चाट, मैल अन सर्फिंग मुळे बिघडत चालली आहे नाती ...
आई-बाबांशी नाही पण मित्रांशी आम्ही खूप खूप वेळ बोलतो.
काय भाजी करायची आज, हे देखील सर्च करून सांगतो.
स्वयंपाक आई करते, पण तो कसा झाला हे सांगायला तिसराच व्यक्ती शोधतो.
कारण आई नावाचा प्राणी कधीच online नसतो.
हुशार आम्ही प्रोग्रामर्स आम्हाला काय कुणाची भीती
चाट, मैल अन सर्फिंग मुळे बिघडत चालली आहे नाती ...
प्रेम, माया, प्रीती, या साऱ्या भावना शब्दांत वर्णन करतो.
शब्द अपुरे पडलेच तर, फिलिंग चा उपयोग करतो.
समोरच्याला शब्दांचा अर्थ निट कळला तर ठीक, नाहीतर अर्थाचा अनर्थ होतो.
नात्यांचा गुंता सुटण्याआधी अधिकच गुंतत जातो.
कारण हुशार आम्ही प्रोग्रामर्स आम्हाला काय कुणाची भीती
चाट, मैल अन सर्फिंग मुळे बिघडत चालली आहे नाती ...
आजी-आजोबा सोबत नसतांना, कशी जळते पणती ?
परक्या खोट्या नात्याची, वाटत नाही का कधी भीती ?
मोठ्या अवघड स्वप्नांची, वेळे अभावी कशी होईल पूर्ती ?
अपेक्षा, इच्छा, प्रयत्न, ध्यास, pending च राहती
कारण हुशार आम्ही प्रोग्रामर्स आम्हाला काय कुणाची भीती
चाट, मैल अन सर्फिंग मुळे बिघडत चालली आहे नाती ...
नाती टिकण्यासाठी कशा कशाचीच गरज नसते
हवा असतो फक्त थोडासा सहवास .....

Tuesday 20 September 2016

परिवर्तन
परिवर्तन परिवर्तन खरंच झालंय का हो आता ?
तप्त सूर्याला शांत लाल पाहतो का आपण आता?
घराच्या अंगणात सदा रांगोळी दिसते का हो आता ?
वाऱ्याची मंद झुळूक, पक्ष्यांची किलबिलाट कानी पडते का आता ? 
आपण खरंच बदलतोय का आता ? ।।१।।
एकमेकांना समजून घेणं घरात तरी जाणवत का ?
चिमण्या बाळानं आई म्हणावं, इतका वेळ तरी असतो का ?
रोजचं सजण राहू द्या, पण भांगात कुंकू तरी भरतो का ?
खरंच आपण बदलतोय का ? ।।२।।
म्हातारपणाची काठी म्हणून कधी कोणाची होऊ का ?
इतरांसाठी जगण सोडा, स्वतःसाठीतरी वेळ काढतो का ?
माणूस म्हणून जगतांना एवढा विचार करतो का ?
खरंच आपण बदलतोय का ? ।।३।।
सायंकाळी दिवे लागणीला चिमणी पाखर घराकडे वळतात का ?
रात्री आधीची संध्याकाळ, घरात राहून अनुभवतो का ?
सर्वांना सुखी ठेव म्हणून, मागणं मागायला, हात तरी जोडतो का ?
खरंच आपण बदलतोय का ? ।।४।।
मातृभाषेतून शिकतांना देखील तिचा विचार करतो का ?
मराठीतून बोलणाऱ्याला मात्र निरक्षरच समजतो ना ?
इतकं समोर असूनही आपण बदलतोय ना ?
खरंच आपण बदलतोय का ? ।।५।।
मराठी वर्ष , मराठी सण, कधीतरी आठवतो का ?
पण डिसेंबर महिन्यातील ३१ तारीख, कधीतरी विसरतो का ?
खरंच आपण कधीतरी कुठेतरी चुकतोय का ?
बदल परिवर्तन नियम निसर्गाचा 
म्हणून जून ते सोन हे खोट का ?
स्वार्थासाठी आपण निसर्ग नियम बदलतोय का ?
खरंच आपण बदलतोय का ? 
खरंच आपण बदलावं ?
खरंच आपण बदलावं ?
हो आपण बदलावं ...... पण 
पण जून ते सोन अन नव ते हवं म्हणत बदलावं ...... ।।६।।
पूजा मुंडले. (अनामिका) 


Wednesday 31 August 2016

वाटे आयुष्यभर लहानच राहवे 
सगळं जग विसरून आईच्या कुशीत झोपावे
काळजी, चिंता, हे शब्दचं माहित नसावे
वाटे आयुष्यभर लहानच राहवे ....

संकट येताच बाबांजवळ जाणे
बाबांच्या आवाजाला थोडं दचकून अभ्यासाला बसावे
वाटे आयुष्यभर लहानच राहवे ....

आपली आवडती वस्तू न मागताच मिळवणे
वेळेचं काळाचं कसलंच बंधन नसणे
वाटे आयुष्यभर लहानच राहवे ....

वाटेल तेव्हा वाटेल तसं स्वच्छंदी जीवन जगणे
फुलपाखरांप्रमाणे सर्व दूर फिरावे
वाटे आयुष्यभर लहानच राहवे ....

कवच्या बाहेरील जग अजब आहे फार
ऐरावत रत्न थोर त्याला अंकुशाचा मार
म्हणून वाटे आयुष्यभर लहानच राहवे ....

सगळं जग विसरून आईच्या कुशीत झोपावे
वाटे आयुष्यभर लहानच राहवे ....

Monday 15 August 2016

सहज आठवली कविता आजच्या दिवशी …..
काय आणि का घेते मी प्रतिज्ञा……?
काय आणि का घेते मी प्रतिज्ञा, फ़क्त शब्दांचे बुडबुडे
जाते का कधी लक्ष, आपले तिच्या अर्थाकडे ?
म्हणता भारत देश आमचा, आम्ही भाऊ भाऊ सारे
का मग दंगली करता, तुमच्या मातृप्रेमाचे पुकारे ?
अभिमानाने सांगता, की भारतावर आमुचे प्रेम अती
मग भ्रष्टाचार करुन, का करता देशाची अधोगती ?
म्हणता आम्ही असू प्रामाणिक सदैव भारतमातेशी
करूयाका विचार, आहोत का प्रामाणिक किमान स्वतःशी ?
म्हणतांना जीवापाड जपू आमची भारतीय संस्कृती
मग का हो दडून बसते मनावर परकीय संस्कृती ?
ही प्रतिज्ञा का मग समाजात पोरासोरांची
आमची म्हणून घेण्याइतकीच किंमत नव्हे तिची …
घ्यायचीच असेल प्रतिज्ञा तर मनापासून घ्या
अन ती पाळण्यासाठी जरा तिच्या अर्थाकडे लक्ष द्या
अन ती पाळण्यासाठी जरा तिच्या अर्थाकडे लक्ष द्या……
अनामिका  …

भारत माता कि जय !

Thursday 9 June 2016



गुज-गोष्टी
"वाट पाहून तुझी, मन व्याकूळ झाले,
एकदा तरी तू मनसोक्त भेटून जा रे ."
तो म्हणाला,"वेडे, अस हळवं नाही व्हावयाच,
कितीही भरून आले, तरी लगेच नाही कोसळायच. "
"चातकासारखी आतुरतेने तुझी वाट किती पाहू?
तुझ्यासाठी आसुसला जीव, सांग कसा तुला दाऊ ?
दुष्काळ,प्राणहानी,आत्महत्या अजून किती साहू ?
तुझ्याविना जीवन मुश्किल,आता अंत नको पाहू . "
मी नक्की येईन,माझं जीवनच आहे वहायला ,
पण तुला नको का माझी नेमकी किंमत कळायला?
नेहमी वेळेवर आलो तर लागशील मला टाळायला ,
वाट पाहून तरी शिकशील नियोजन पाळायला .
कमजोर नाही मी , केव्हाही कसाही कोसळायला,
पाषाणहृदयी हि नाही , तुला इतकं छळायला .
मलाही आवडेल रसिकतेने तुला अस सजवायला,
नाहू-माखू घालून सप्तरंगात नखशिखांत फुलवायला ."