Monday 13 April 2020

थोडा विचार करो ना' लॉकडाउन दिवस दुसरा..25/3/2020

देश-धरमपर मिटनेवाला शेर शिवाका छावा था ।महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभु राजा था ॥धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा आज तिथीनुसार बलिदानदिन ! विनम्र अभिवादन !

१. जगातील पहिले बुलेट प्रुफ जॅकेट युद्ध भूमीवरील गरज लक्षात घेऊन फक्त एका महिन्यात तयार करणारा
२. जगातील पहिला तरंगता तोफखाना तयार करणारा जंजिरा जिंकण्यासाठी उसळत्या सागरात आठशे मीटरचा सेतू बांधणारा
३. आदिलशाही, कुतुबशाहीची एकजूट करणारा आणि त्याचवेळी सिद्धी, पोर्तुगीज व इंग्रजांना त्यांच्या बिळात कोंडून ठेवणारा , त्याच वेळी मोघलांचा कर्दनकाळ ठरलेला
४. दुष्काळ ग्रस्त गावांना कायमस्वरूपी पाणी मिळावे म्हणून डोंगर पोखरून जल नियोजन करणारा
५. उत्तरप्रदेशापासून दूर तामिळनाडू कर्नाटक आणि राजस्थान प्रांतातील लोकांनाही स्वराज्यासाठी एकत्र करणारा
६. इतर धर्मांचा मान सन्मान राखणारा
७. धर्मांतरावर कायदेशीर बंदी घालणारा
८. बाल मजुरी व वेठबिगारी विरुद्धकायदा करणारा
९. शिवप्रभूंची इच्छा पूर्ण करण्यासाठी राज्याभिषेक झाल्यावर पंधराव्या दिवशीच दूर मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपूरवर छापा घालणारा
१०. स्वराज्याला आर्थिक संपन्न ठेवणारा
११. देहू ते पंढरपूर आषाढीवारीला संरक्षण व अर्थ पुरवठा करणारा
१२. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शेतीसाठी पीक कर्ज योजना राबविणारा
१३. सैनिकांच्या उत्पन्नाला इतर मार्गाने हातभार लागावा म्हणून चरईची सवलत कायम ठेवणारा
१४. आपले आरमार सुसज्ज करण्यासाठी परदेशातुन तंत्रज्ञान व प्रशिक्षित लोकांचे सहकार्य घेणारा
१५. स्वतःचे आधुनिक बारुदखाने तयार करून स्वदेशीचा महामंत्र देणारा
१६. 'राष्ट्र’ जिवंत ठेवण्यासाठी साध्या कल्पनेनेही थरकाप उडेल असा अमानुष छळ... ह्या सच्च्या योद्ध्याने तोंडातून ब्रसुद्धा न काढता हसत हसत झेलला.
कठीण परीक्षेच्या क्षणांमधे आधार शोधत असताना अशी आदर्श व्यक्तीमत्वेच आपल्याला योग्य वाटा दाखवत असतात. अश्या अनेक वीरांच्या भूमीत आपण जन्म घेतला ह्याचं समाधान मानण्याचा आजचा दिवस!

आज आपल्यावरचा प्रसंग ह्यापेक्षा कितीतरी सोपा आहे. परीक्षा द्यायला लावणारा आहे. सुखसोयींनी भरलेल्या घरात आपल्याला फक्त शांत बसायचं आहे. मृत्यूला हसत हसत आलिंगण देणारे थोर क्रांतिकारक आपण आठवू या .. स्वातंत्रवीर सावरकरांनी राष्ट्रासाठी अकरा वर्षे अंदमानाच्या काळकोठडीत शत्रूचा छळ सोसत कशी काढली असतील असा नुसता विचार जरी मनात आणला तरी घरातून बाहेर पडणारं आपलं पाऊल नक्कीच थबकेल. आपल्या घराच्या उंबरठ्यालाच आपली मर्यादा मानून ती न ओलांडण्याचं व्रत घेऊन आपण ह्या संकटाशी चाललेला मुकाबला यशस्वी करूया. शासनयंत्रणेनं वेळेत पावलं उचलून युद्धपातळीवर काम सुरू केलं आहेच... आपण नियमभंग करून त्यांची ताकद व वेळ आपल्यावरच्या कार्यवाहीत खर्च होणार नाही इतकंच सांभाळूया!
त्यांच्यावरचा ताण वाढवायचं बेजबाबदार कृत्य नको. जीवनावश्यक वस्तूंचा प्रचंड साठा नको.
नियमांचे भान राखूया! सुचनांचे पालन करून, आपला खारीचा वाटा उचलूया! निरोगी राहुया.....
निरोगी राहुन, नियमांचे, सुचनांचे पालन करूया
आपला खारीचा वाटा उचलूया का?
थोडा विचार 'करो ना'...
अनामिका (PMJ)

No comments:

Post a Comment