Monday 13 April 2020

थोडा विचार 'करो ना' लॉकडाउन दिवस चौदावा..6/4/2020

भूदान चळवळीच्‍या काळातील ही गोष्‍ट आहे. या चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे होते. त्‍यांची पदयात्रा सुरु होती. आपल्‍या काही शिष्‍यांसह विनोबाजी मीराजींच्‍या आश्रमात थांबले होते. अल्‍पशा विश्रांतीनंतर त्‍यांची पदयात्रा पुन्‍हा सुरु झाली. त्यावेळी ते हरिद्वारकडे चालले होते. विनोबाजींची प्रकृती थोडी ठीक नव्‍हती. त्‍यांची कंबर आणि पाय दुखत होते. त्‍यामुळे त्‍यांना खुर्चीत बसवून नेण्‍यात येत होते. मध्‍ये मध्‍ये खुर्चीतून उतरून पायी चालायचे. तेव्‍हा एक शिष्‍य त्‍यांच्‍याजवळ येऊन म्‍हणाला,'' बाबा, मला खूप राग येतो, मी काय करावे'' विनोबाजी म्‍हणाले,'' मी लहान असताना मलाही खूप राग यायचा, मग माझ्याजवळ मिश्री असायची ती मी तोंडात ठेवायचो, परंतु कधीकधी ती ही नसायची'' मग तुम्‍ही काय करत होता असे त्‍या व्‍यक्तीने विचारले. विनोबाजी म्‍हणाले,'' मी यावर खूप विचार केला, मग माझ्या मनात एक गोष्‍ट आली. जेव्‍हा आपल्‍या मनाविरूद्ध एखादी गोष्‍ट आली जेव्‍हा आपल्‍या मनाविरूद्ध गोष्‍ट घडली तर लगेच नाराज होतो जर तो क्षणच आपण टाळला तर रागावर विजय मिळवू शकतो. आनंद आणि नाराजी यावर आपण तेव्‍हाच प्रकट करतो तो पहिलाच क्षण आपल्‍यावर वरचढ ठरू पाहतो. तो क्षण टाळणे कठीण आहे. पण मनन करून तो टाळता येतो. मी यावर खूप मनन केले, यामुळेच जीवनात कितीही मोठी आपत्ती आली तरी मी संयम ढळू दिला नाही.''

विचारपूर्वक उचललेले पाऊल आयुष्‍याला योग्‍य दिशा देते. हेच काय ते या कथेचे तात्‍पर्य...

मित्रहो आपल्यालाही असचं काहीस करायचयं या संकटसमयी बर्याचदा आपल्याला राग येईल, संताप येईल,घरात बसुन बसुन कंटाळा येईल. सारखी चिडचिड होईल घरात बसाव लागत, नियम पाळावे लागतांय म्हणून अक्षरक्ष: कोणालातरी चार शिव्या घालाव्या वाटतील. पण मिर्तहो योग्य-अयोग्यतेच्या शंकाकुशंका ‘सांगोवांगी’वर नव्हे तर माणुसकीच्या कसोट्यांवर तपासून पाहू... अंतर स्वच्छ, निर्मळ झाल्याचं जाणवेलच... तीच भावना घेऊन एकात्मभावानं उभे राहू.. मग कोणत्याही संकटाची बिशाद नाही आपल्याला हरवण्याची..

आज नऊ वाजता घरातले लाईट बंद करून एक पणती/मेणबत्ती/दिवा उंबऱ्याशी किंवा बाल्कनीमधे लावायचा आहे. आजूबाजूचं सगळं दृष्टीआड करण्यासाठी संपूर्ण अंधार करून फक्त उजळलेल्या दिव्याच्या वातीकडे पाहू... आपल्याही अंतरात एक ज्योत उजळवू या .. तिच्या साक्षीनं आपल्यासाठी, देशासाठी जीव तोडून झटणाऱ्या आपल्या बांधवांसाठी कृतज्ञतेने प्रार्थना करूया....
एक दीप से सहस्त्र दीप जगमगा उठे ..कोटि कण्ठ एक स्वर में मातृगान गा उठे ....वंदे मातृभूमि, वंन्दे ...
विचारपूर्वक उचललेले पाऊल आयुष्‍याला योग्‍य दिशा देते. हे माहीत असूनही, संयम ढळू द्यायचा का? थोडा विचार 'करो ना'....
अनामिका (PMJ)

No comments:

Post a Comment