Tuesday 26 September 2017

प्रेम या विषयावर लिहावंसं वाटलं आज ......

   प्रेम या विषयावर लिहावंसं वाटलं आज ......
  काल एक मैत्रीणींशी खूप वेळ गप्पा मारल्या लग्न झाल्याचं सांगितलं. अभिनंदन वैगरे करून झाल्यावर काय करतात पंत आमचे विचारपूस करून ती मला म्हणाली "तुम्ही मुली असं ठरवून लग्न करूच कस शकता? बोटावर मोजता येतील इतक्याच दोन चार भेटीत, सर्वांसमवेत चहा-पोहे, अगदीच वाटलं तर लग्न ठरण्याआधी एखादा फोन या आधारावर अख्य आयुष्य कस उधळून टाकता तुम्ही?

    थोड्याच क्षणात ठरवूच कस शकता? कुणी एक व्यक्ती तुमचं आयुष्य बनून जाईल तुमचं खरं प्रेम होत त्या व्यक्तीवर लग्नानंतर? कि फक्त केलाय लग्न म्हणून निभावता सगळं?" असे एक ना अनेक प्रश्न, मी फक्त ऐकत होते तेव्हा माझा फारसा मुड नसावा बोलण्याचा पण शेवटी माणूस सवयीचा गुलाम विषय मिळाला. लिहावंसं वाटलं खूप दिवसांनी कधीही न लिहिलेल्या विषयावर. तिला उत्तर द्यायचं म्हणून नाही पण खरंच लिहावंसं वाटलं या विषयच सर्वात महत्वाचा धागा म्हणजे प्रेम....  

    प्रेम म्हणजे उत्साह, सळसळत चैतन्य, दुसऱ्याला स्वीकारण्याची असीम क्षमता, वात्सल्य, ममता, सकारात्मकता, शांत वृत्ती, एकाग्रता, आनंद, समाधान, निरागसता, निरपेक्षता, आत्म्याचा पवित्र हक्क, सुवर्ण बंधन जे कर्तव्य आणि सत्याला जोडत डोळ्यांना दिसत नाही ते आतून अनुभवत. 

     प्रेम लाभे प्रेमळाला त्याग हि त्याची कसोटी प्रेम फळासारखं असत फळ जस पक्व होत जात तसतस ते अधिक सुंदर दिसत त्याचा गाभा बी तीच असते.  पण रंग आणि पडतो तसच प्रेमाचही आहे प्रेमही परिपकव्य होत जात प्रेम सौंशय मुक्त असत, त्यागयुक्त असत, समाजाच्या सहानुभूतीच ते मुमताज नसत, प्रेम कायम उमलत असत, उपजत असत, प्रेमाशिवाय जीवन स्मशान असत, फुपाखराचं फुलावर असत, आईच बळावर असत, निसर्गाचं माणसावर असत, सावित्रीचा सत्यवानावर असत, प्रियकराचा प्रेयसीवर असत. 

Hamen tum se pyaar kitana, ye ham nahin jaanate
Magar ji nahin sakate, tumhaare bina 

    हे गाणं प्रेमाच्या व्याख्येत कधीच बसत नाही यात व्याकुळता आहे वासना आहे हव्यास आहे लोभ आहे म्हणजे प्रेम नव्हे.  लाख नुसत्या जीव घेण्या तऱ्या, प्रेमात कुणीच मरत नसत. आई वडिलांचं जस मुलांवर प्रेम असत तसच मुलांनचली खूप असत ते फक्त व्यक्त करण्याची गरज असते आपण ते व्यक्तच करत नाही का?सल्लज असत ते प्रेम अबोल असून बोलकं असत ते प्रेम.
    प्रेमात व्यक्ती जवळ असावी असं नाही प्रेमात बंधन असाव असाही नाही समजून उमजून आपोआप फुलात ते प्रेम. म्हणतात ना नात्यांची मजा ती हळुवार उलगडण्यात असते. फुलू द्या नात्यांना, उधळू द्या आसमंतात त्याची फुल. प्रेम द्या प्रेम घ्या जगातल्या प्रत्येक नात्यावर मनापासून प्रेम करा आणि सदाआनंदी राहा कारण आनंदाला विरुद्धअर्थी शब्द नाहीये....... 
अनामिक (PMJ)

1 comment: