Friday 8 May 2020

थोडा विचार 'करो ना' काव्यमाला 4


नमस्कार मित्रहो..
घरीच राहू या... सुरक्षित राहू या ..
ये कह के दिल ने मेरे हौसले बढाए है।
गमों की धूप के आगे खुशी के साए है।

कोरोनामुळे काय झाले याचा विचार करतांना या आपत्तीने आपण काय शिकलो? हे पण खूप महत्वाचे आहे. शेवटी काहीही झाले तरी मनाने मात्र हार मानू नये, हेही तितकेच महत्वाचे...

संकटाने आम्हाला काय शिकवल ?
सर्वप्रकारचे मोठ्याप्रमात प्रदुषण करणारे आम्ही,
संकटान निसर्गाच सुंदर रुप पहायला शिकवल...

सौंदर्य प्रसाधने व ब्युटी पार्लरवर खर्च करणारे आम्ही,
संकटान साधी राहणीमानच महत्व शिकवल..

बडेजावपणासाठी बाहेर होटलींग करणारे आम्ही,
संकटान घरच्या अन्नाची चव चाखायला शिकवल..

लहान-मोठ्या कार्यक्रमावर अवास्तव खर्च करणारे आम्ही, संकटान साधेपणान सोहळा करायला शिकवल..

घरासाठी जगुनही कधीही घरी न राहणारे आम्ही,
संकटान आपल्या माणसांना जवळून ओळखयला शिकवल...

जगण्यासाठी ध्येयावेडे बेधूंदपणे वागणारे आम्ही, संकटान जगण्यासाठीच थांबायला शिकवल...

आर्थीक, भावनिक, मानसिक,सामाजिकरित्या अपूर्ण असणारे आम्ही,
संकटान आम्हाला स्वयंपूर्ण होण्यास शिकवल
स्वयंपूर्ण होण्यास शिकवल....
अनामिका (PMJ)

1 comment: