नमस्कार मित्रहो सुप्रभात....
घरीच राहू या... सुरक्षित राहू या ..
सध्या काहीदिवस एकच विचार करू या
"सर सलामत तो पगड़ी पचास", "जान है तो जहान है"
फक्त आम्ही जगलो पाहीजे...
पैसा अडका नुकसान नफा, नको ताळेबंद आता..
वाट्टेल ती किंमत देवू आम्ही, जीवन हाच आमुचा नफा
फक्त आम्ही जगलो पाहीजे...
नको बर्गर, नको पिस्ता, पास्ता, नको चायनिज, नको सुग्रास जेवणाचा घाट, नको आता पंचपक्वानांचे ताट
पोटाची खळगी भरेल इतका पुरूदे अन्नसाठा..
फक्त आम्ही जगलो पाहीजे...
गाडी,बंगला,बँक बॅलेन्स,नोकर-चाकर काही काही नकोय.
नकोय खुप सुखसोई, नको आरामाच्या सवयी
अन्न, वस्र, निवारा पुरू दे सर्वत्र
फक्त आम्ही जगलो पाहीजे...
नको मोबाईल, कम्प्यूटर, इंटरनेट, टिव्ही, मुव्हीज,वेब सिरीज, काही काही नको रे ..
माणसाला माणसाची शेवटपर्यंत, सोबत तेवढी असली पाहीजे..
फक्त आम्ही जगलो पाहीजे...
इच्छा, आकांक्षा, लोप पावल्या, लोप पावल्या दाही दिशा .
सृष्टी सौंदर्य वाढविण्यासाठी माणूस जगु दे हाच वसा
फक्त आम्ही जगलो पाहीजे...
अनामिका (PMJ)
15-04-2020
Wa asach lihit raha
ReplyDelete