Monday 15 August 2016

सहज आठवली कविता आजच्या दिवशी …..
काय आणि का घेते मी प्रतिज्ञा……?
काय आणि का घेते मी प्रतिज्ञा, फ़क्त शब्दांचे बुडबुडे
जाते का कधी लक्ष, आपले तिच्या अर्थाकडे ?
म्हणता भारत देश आमचा, आम्ही भाऊ भाऊ सारे
का मग दंगली करता, तुमच्या मातृप्रेमाचे पुकारे ?
अभिमानाने सांगता, की भारतावर आमुचे प्रेम अती
मग भ्रष्टाचार करुन, का करता देशाची अधोगती ?
म्हणता आम्ही असू प्रामाणिक सदैव भारतमातेशी
करूयाका विचार, आहोत का प्रामाणिक किमान स्वतःशी ?
म्हणतांना जीवापाड जपू आमची भारतीय संस्कृती
मग का हो दडून बसते मनावर परकीय संस्कृती ?
ही प्रतिज्ञा का मग समाजात पोरासोरांची
आमची म्हणून घेण्याइतकीच किंमत नव्हे तिची …
घ्यायचीच असेल प्रतिज्ञा तर मनापासून घ्या
अन ती पाळण्यासाठी जरा तिच्या अर्थाकडे लक्ष द्या
अन ती पाळण्यासाठी जरा तिच्या अर्थाकडे लक्ष द्या……
अनामिका  …

भारत माता कि जय !

No comments:

Post a Comment