सहज आठवली कविता आजच्या
दिवशी …..
काय आणि का घेते मी प्रतिज्ञा……?
काय आणि का घेते मी
प्रतिज्ञा, फ़क्त शब्दांचे बुडबुडे
जाते का कधी लक्ष,
आपले तिच्या अर्थाकडे ?
म्हणता भारत देश आमचा,
आम्ही भाऊ भाऊ सारे
का मग दंगली करता,
तुमच्या मातृप्रेमाचे पुकारे ?
अभिमानाने सांगता,
की भारतावर आमुचे प्रेम अती
मग भ्रष्टाचार करुन,
का करता देशाची अधोगती ?
म्हणता आम्ही असू प्रामाणिक
सदैव भारतमातेशी
करूयाका विचार, आहोत
का प्रामाणिक किमान स्वतःशी ?
म्हणतांना जीवापाड
जपू आमची भारतीय संस्कृती
मग का हो दडून बसते
मनावर परकीय संस्कृती ?
ही प्रतिज्ञा का मग
समाजात पोरासोरांची
आमची म्हणून घेण्याइतकीच
किंमत नव्हे तिची …
घ्यायचीच असेल प्रतिज्ञा
तर मनापासून घ्या
अन ती पाळण्यासाठी
जरा तिच्या अर्थाकडे लक्ष द्या
अन ती पाळण्यासाठी
जरा तिच्या अर्थाकडे लक्ष द्या……
अनामिका …
भारत माता कि
जय !
No comments:
Post a Comment